आशाताई बच्छाव
पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा
– जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट
जालना, दि. १२ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस
उन्हाची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ
गाठला आहे. त्यामुळे जिल्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होत आहे.
अनेक तांडे, वस्त्या व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी
लागत आहे. याठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. जेणेकरून सामान्य नागरिकास
त्याचा दिलासा मिळेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनियार यांना दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या
शिष्टमंडळाने शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले व जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी जगदीश मिनियार यांची भेट घेतली. जालना जिल्हा परिषदेत नव्यानेच
रुजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांचे शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईसह इतरही समस्या मांडून जिल्ह्यातील
एकूण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यावेळी जिल्हा
संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम,मुरलीधर शेजुळ, बाबुराव
पवार, रमेश गव्हाड, मनीश श्रीवास्तव, मुरलीआबा थेटे, तालुका प्रमुख हरिहर
शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांनी म्हटले की, अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर
खराब झालेले आहेत.






