Home उतर महाराष्ट्र भास्करगिरी महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

भास्करगिरी महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

128

आशाताई बच्छाव

1001117187.jpg

भास्करगिरी महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
अलंकापुरी /अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र आळंदी येथील तपोवन वेदश्री वेदशाळेच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगड (ता. नेवासे) येथील श्रीदत्त संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांचा शाल, पुष्पहार व विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन संतपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी विठूनामाचा व संतश्रेष्ठ माउली नामाचा जयघोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला.
अयोध्यातील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज
यांच्या संकल्पनेतून वेदश्री वेदशाळेत संत कृतज्ञता संवाद मेळाव्यात राज्यातील प्रमुख संत, महंतांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज, मारुती बाबा कुहेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी प्रांताचे धर्माचार्य जनार्धन महाराज मेटे व आमदार महेश लांडे उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र ५२ वें राज्य स्तरीय नाट्य स्पर्धा… भंडारा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट अभिनय म्हणून गौरव…
Next articleआदर्श विद्यामंदिर मध्ये विज्ञान मेळावा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.