Home नाशिक आदर्श गाव विकासासाठी रोझे ग्रामपंचायतीकडून आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेची निवड

आदर्श गाव विकासासाठी रोझे ग्रामपंचायतीकडून आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेची निवड

238

आशाताई बच्छाव

1001198396.jpg

आदर्श गाव विकासासाठी रोझे ग्रामपंचायतीकडून आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेची निवड
मालेगाव:- तालुक्यातील रोझे ग्रामपंचायतीकडून आदर्श गाव विकासासाठी आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेला ग्रामसभेतून ठरावा व्दारे सामाजिक क्षेत्रातील विविध कार्य करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड व उपसरपंच सोमनाथ सहादू उगले यांनी दिली.
आश्रयआशा फाऊंडेशन हि संस्था सामाजिक व विविध क्षेत्रात कार्यरत असून,संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राभर असल्याने,रोझे गावाच्या विकासासाठी आदर्श गाव संकल्पना राबवून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गावाची आदर्श गावाकडे वाटचालीसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने कार्य केले जाणार आहे.संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावी आहे.तर संस्था भारत सरकारच्या निती आयोगाकडे नोंदणीकृत आहे.संस्थेला आय.एस.ओ.प्रमाणपत्र प्राप्त असून,संस्था महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड झालेली आहे.त्यामुळे रोझे गावांसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे मोलाचे योगदान लाभणार आहे.

Previous articleनाशिकमध्ये महिला वकीलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
Next articleवारजे विकास कृती समितीच्या वतीने प्रशासना दिला इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.