Home भंडारा पिकांची फेरपालट करा-किड रोगांचे नायनाट करा.. उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा

पिकांची फेरपालट करा-किड रोगांचे नायनाट करा.. उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा

60
0

आशाताई बच्छाव

1001115513.jpg

पिकांची फेरपालट करा-किड रोगांचे नायनाट करा..

उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा

 

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी)डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत दिनांक ३ जानेवारी २०२५ ला डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत मौजा तिर्री तालुका पवनी येथील ग्रामपंचायत सभागृह परिसरामध्ये गाव पातळीवरील दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात *क्रांतीज्योती, विद्येची जननी, पहिल्या महिला स्त्री शिक्षिका, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली*
सदर प्रशिक्षणाला प्रमुख उपस्थिती म्हणून उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत विविध उपक्रमामार्फत त्यामध्ये शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकरी गट, शेत बांधावरील प्रयोगशाळा, दहा ड्रम थेरी, अशा विविध अशा विविध नैसर्गिक घटकांच्या वापर करून वाढता उत्पादनाला खर्च बचत करून उत्पन्न वाढवून शाश्वत आणि गुणवत्तेची उत्पादन करावे असे प्रतिपादन केले. सोबतच कीड रोगांचे नियंत्रण करता पिकांची फेरपालट करून रोगांचे जीवन चक्र कसे बदलेल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक आदित्य घोगरे तालुका कृषी अधिकारी, पवनी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना *विशेषता शासन आपल्या दारी* या संकल्पनेतून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध अडचणींचे ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्थळी निराकरण करून उपस्थिताना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून निविष्ठा स्वतः तयार करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे आणि मातृभूमीचे संरक्षण करावे असे प्रतिपादन केले.
*शेतकरी मनोगत*
नरेंद्रजी आयतूलवार प्रगतिशील शेतकरी तथा गटप्रवर्तक डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान यांनी प्रशिक्षण दरम्यान शेतकऱ्यांनी केवळ एक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता भाजीपाला, फळबाग आणि ऊस अशा विविध पिकाकडे वळून ठिबक सिंचनाचा वापर करून ऊस उत्पादन करावे आणि त्याकरिता कृषी विभाग आपल्या पाठीशी सदैव तत्पर आहे असे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि *हैदराबाद येथे एनआयपीएचएम* या संस्थेमध्ये प्रशिक्षणा दरम्यान आलेले अनुभव मित्र किडी शत्रू किडी आणि त्यामधील फरक या अनुभवाचे कथन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन
शसतिश वैरागडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, भंडारा यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान व्याप्ती, संकल्पना, गट स्तरावरील जैविक निविष्टा केंद्र, Biodyanamics, S9 Culture, शेतकरी उत्पादक कंपनी, समभाग, प्रमाणीकरण आणि योजनेविषयी माहिती दिली तसेच जिवामृत, बिजामृत, निंबोळी अर्क, दशपर्नि अर्क, माती परीक्षण, माती नमुना घेण्याची पद्धत तसेच मृद आरोग्य पत्रिका वाटप व वाचन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित भूमेश नवखरे कृषी पर्यवेक्षक पवनी, यांनी माती नमुना कसा घ्यावा तसेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या माती नमुना अहवालाचे वाचन करून उपस्थित त्यांना खतांचा समतोल वापर त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रेम खेकारे कृषी सहाय्यक तिर्री यांनी नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना विभागातील विविध योजना त्यामध्ये महाडीबीटी, यांत्रिकीकरण, अपघात विमा योजना, ठिबक सिंचन, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाला पप्रामुख्याने उपस्थिती म्हणून सुरेंद्र आयतुलवार सरपंच तिर्री, हर्षवर्धन गणवीर उपसरपंच तिर्री, पितांबर गळमळे आणि मोतीलाल बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थितीत आणि शांतीलाल गायधने मूल्यसाखळी तज्ञ *SMART*,भंडारा तसेच तिर्री आणि शेगाव या गावातील गटातील शेतकरी आणि उमेद अंतर्गत गट संयोजिका
निर्मलताई खेडकर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रेम खेखारे कृषी सहाय्यक यांनी केले तर आभार भूमेश नवखरे कृषी पर्यवेक्षक यांनी करून प्रशिक्षणाची सांगता केली सदर प्रशिकक्षणाला गटातील ८६ महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Next articleजगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here