आशाताई बच्छाव
हिंगोली येथे सम्राट प्रसेनजित विचार साहित्य संमेलन संपन्न
हिंगोली( संजीव भांबोरे)येथे दिनांक २९ डिसेंबर रोजी सम्राट प्रसेनजित साहित्य संमेलन संपन्न झाले. व अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घघाटक मा. प्रा. विजय कुमठेकर इतिहास अनुवादक तथा साहित्य विश्लेषक ,हे होते तर कार्यक्रमांचे अध्यक्ष मा. शिवराज कोळीकर ,हे होते व्याख्यान मालेचे अध्यक्षा सौ. विमलताई वाघमारे जेष्ठ साहित्यिक तथा इतिहासकार ह्या होत्या व स्वागत अध्यक्ष डॉ.अमोल धुमाळ हदयरोग तज्ञ ,हे होते प्रमुख पाहुणे म्हणून गणेश मेकाने साहित्य कवी , मुरलीधर रणखांब परभणी , वसंत गवळी गोदीया, सुभाष वैरागड , सतिश लोखंडे पत्रकार छत्रपती संभाजीनगर , चंद्रप्रकाश शिंदे बीड , बबनराव मोरे , दिपक रणखांब , हिंगोली , ए. एम . खंदारे , बबन हिंगोले परभणी ,प्रकाश भालेराव सवनेकर , सुनील डोंगरे यवतमाळ, राजाभाऊ हातगळे ,चंद्रशेखर हातगळे , अमरावती , चंद्रशेखर गालफाडे दौंड , देविदास खरात , बाबुराव गोड , चंद्रकांत पौळकर , वाशिम , चंद्रकांत अवचार उद्योजक , इ. मान्यवर व साहित्य प्रेमी कवी . राज्य भरातील विविध जिल्ह्यांमधून आले होते. सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.हरीषकुमार रणबावळे सवनेकर यानी केले होते तर सुत्रसंचालन देविदास खरात यांनी केले यशस्वीतेसाठी प्रकाश हिंगोले , बबन मोरे ,दिपक रणबावळे , मधुकर कांबळे , ए.एम.खंदारे ,माधव सवनेकर ,प्रकाश भालेराव , बाबुराव गाडे , चंद्रकांत पोळकर , बबन खंदारे , अभिमन्यू रणबावळे , दिगंबर नायक ,प्रविण नायक ,संग्राम बांबू नायक , अतुल नामक ,कांचन अवचार , आदींनी परिश्रम घेतले. व कार्यक्रमाच्या मधल्या सत्रात स्नेह भोजन व चाहापाणी ठेवण्यात आले होती.






