आशाताई बच्छाव
पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: शहरात होत असलेल्या पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनधाराकांची सुटका होणार असून विकासाची ही सर्व कामे आपण पूर्ण करुन घेऊत, निधीची चिंता करण्याचेही कारण नाही, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना केले.÷
आ.श्री.खोतकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 67 कोटींपैकी आज बुधवारी भिमराज प्रवेश व्दार ते जयनगर चौकापर्यंतच्या 15 मिटर रुंद सिमेंट रस्ता बांधकामासाठी चार कोटी 69 लक्ष 70 हजार रुपये, राष्ट्रमाता महाविद्यालय ते रेल्वे उड्डाणपुलातपर्यंतच्या सिमेट रोडचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी 50 रुपये आणि आरपी रोड ते अग्रसेन फाऊंशेडन म्हणजेच अब्दुल हमीद चौकापर्यंतच्या (कॉलेज रोड) सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 15 लक्ष रुपयांच्या या कामांचा उद्घाटन सोहळा आ. श्री. खोतकर यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी आ. श्री. खोतकर बोलत होते.
यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, पंडीतराव भुतेकर, राजेश राऊत, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, फिरोजलाला तांबोळी, अॅड. सुनिल किनगावकर, विष्णू पाचफुले, आत्मानंद भस्त, अॅड. भास्करराव मगरे, अमोल ठाकुर, शौळेश घुमारे, संतोषराव मोहिते, गणेशराव सुपारकर, डॉ. सुयोग कुलकर्णी, कालिंदाताई ढगे, सौ. सवितातार्स किवंडे, उज्जलाताई फोपलिया, शेख जावेद, दिनेश भगत, दिपक वैद्य, श्रीकांत पांगारकर, कुणाल जावधव, जफर खान पठाण, योगेश रत्नपारखे, कमलेश खरे आदींची उपस्थिीती होती.
पुढे बोलतांना आ. श्री. खोतकर म्हणाले की, आपण शहर विकासाच्या प्रश्नावर सातत्याने केंद्रित राहणार आहोत. तसेच जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.






