आशाताई बच्छाव
नाफेड च्या माहोरा केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट – कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसं
प्रतिनिधी जालना – वसंतराव देशमुख
दिनांक 26/11/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, माहोरा येथील नाफेडचे खरेदी केंद्र चालू असून त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून १ क्विंटल मागे जवळपास ३ किलो कट्टी लावण्यात येत आहे. चाळणी गाळणीसाठी १५० रुपये घेतले जात आहे. नोंदणीसाठी १०० रुपये घेतले जात आहे. खुलेआम ,शेतकऱ्यांची लूट होत आहे. याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे, खऱ्या अर्थाने हा सर्व खर्च शासन करीत आहे. परंतु परस्पर नाफेडच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची अतोनात लूट केली जात आहे. तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालुन भ्रष्ट नाफेडच्या लोकांवर कारवाई करावी किंवा नाफेड केंद्र बंद करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती शेतकरी करत असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने यांनी म्हटले आहे.याविषयी माहिती घेऊन त्यांनी सांगितले की,सोयाबीन 3 किलो =150.. चाळणी गाळणी=150. नोंदणी फी 100.=400 रुपये, नाफेड कडून दिल्या जाणारा भाव 4892 प्रतिक्विंटल आणि खुल्या मार्केट मधील भाव 4350 आहे तर मग 142 रुपये साठी नाफेड (शासनाच्या सोयाबीन केंद्रात) सोयाबीन द्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन हे केंद्र बंद करावं अशी विनंती शेतकरी करत असल्याचही लहाने यांनी म्हटले आहे.






