आशाताई बच्छाव
शासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) नुकताच महाराष्ट्र सरकारने शंभर
रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून यापुढे प्रतिज्ञापत्र, शपथपत्र , वाटणीपत्र , पतसंस्था कामे , करारनामा भाडे , सामंजस्य करार ,विवाह नोंद प्रतिज्ञापत्र , खरेदी विक्री करार पत्र ,शैक्षणिक , बँक , न्यायालय , इत्यादी कामाकरिता 500 रुपयाचे मुद्रांक घ्यावे लागणार आहे . परिणामी 100 रुपयाच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी 500 रुपयांचा मुद्रांक लागणार आहे . याकरिता 400 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे व याची आर्थिक झळ सामान्यांच्या खिशाला बसणार आहे . विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन अनेक योजनांच्या पाऊस पाडत आहे . तर दुसरीकडे शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करून पाचशे रुपयांचे केल्यामुळे सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड
सहन करावा लागणार आहे . आधीच महागाईने बेजार असलेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले जाणार आहे . राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेचा विचार करून मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे 100 रुपयाचे मुद्रांक कायम ठेवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाशिक चवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .