आशाताई बच्छाव
उत्खननाची रायल्टी चोवा येथील व उत्खनन मात्र मौदी येथील -माजी सरपंच जयश्री वंजारी यांची चौकशीची मागणी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)मौजा मौदी येथील टेकड्यांचे अवैध प्रकारे उत्खनन होत असल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि अस्तित्व धोक्यात आले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की गट क्रमांक 37 मौदी या ठिकाणी अवैध उत्पन्न होत आहे.मात्र रॉयल्टी चोवा गट क्रमांक 83/3 येथील काढलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे शासनाच्या तिजोरीची दूर होत आहे.तसेच अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे .भंडारा तालुक्यातील मौदी अंभोरा या रस्त्याचे काम चालू असून अवैध उत्खननाचे बळी ठरली आहे परंतु महसूल व खनिज कर्म विभाग निद्रा अवस्थेत आहे. जिल्ह्यातील निसर्गनिर्मित टेकड्यांचे सौंदर्य मनमोहक आहे. परंतु मानवी अतिक्रमण व अवैध उत्खननाने पर्यावरणाची व शासनाच्या महसुलाची लूट होत आहे. भंडारा तालुक्यातील मौदी येथील टेकडीचे असेच लूट होतो आहे. पहेला ते अंभोरा रोड सिमेंटकरण होत असल्यामुळे बाजूचे भरण करण्याकरिता मौजा चोवा येथील रायल्टी काढून त्या रॉयल्टी च्या नावाने उत्खनन मात्र मौदी हद्दीत होत आहे. परंतु महसूल व खनिज कर्म विभाग निद्रा अवस्थेत आहे. याच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाने लक्ष देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद माजी सरपंच जयश्री वंजारी यांनी केलेली आहे.