Home भंडारा पालोरा येथे डॉ .ओमप्रकाश गिर्‍हेपुंजे यांच्या ग्रीन व्हिलेज उपक्रमांतर्गत 100 झाडे लावून...

पालोरा येथे डॉ .ओमप्रकाश गिर्‍हेपुंजे यांच्या ग्रीन व्हिलेज उपक्रमांतर्गत 100 झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

182
0

आशाताई बच्छाव

1000606304.jpg

पालोरा येथे डॉ .ओमप्रकाश गिर्‍हेपुंजे यांच्या ग्रीन व्हिलेज उपक्रमांतर्गत 100 झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भविष्यात 1000 झाडे लावण्याचा ग्रीन व्हिलेज चा उपक्रम

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील पालोरा येथे आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 ला डॉ. ओमप्रकाश गिर्‍हेपुंजे ग्रीन व्हिलेज उपक्रमांतर्गत पालोरा गावात विविध जातीची 100 झाडे लावून ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . सध्याच्या वातावरणात फार बदल होत आहेत. यावर्षी आपल्या देशातील व जगात सुद्धा वातावरण फार उष्णतेचे होते. जिकडे तिकडे जास्त वापरण्यात येत असलेल्या एसी व कमी होत असलेली झाडे यामुळे हवेतील गारवा कमी होत आहे. त्या अनुषंगाने आपण एक सामाजिक व पर्यावरण बदल असलेले दायित्व म्हणून भरपूर झाडे लावून त्याचे संगोपन करायला पाहिजे. गावातील नागरिक म्हणून आपण आपल्या गावात झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत हरित पालोरा ग्रीन पालोरा व्हायला पाहिजे .त्याकरिता इच्छुक गावातील नागरिकांनी व संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. ज्यांना वृक्ष मित्र म्हणून सहभाग व्हायचं असेल त्यांनी आपली नावे द्यावीत असे आवाहन पालोरा येथील माजी सरपंच अनिता गिर्‍हेपुंजे यांनी केलेले आहे. भविष्यात 1000 झाडे गावात लावण्याचा त्यांचा मानस असून या ग्रीन व्हिलेज उपक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.

Previous articleलोकहो,वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा –राहुल डोंगरे
Next articleम्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीच्या वतीने सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here