आशाताई बच्छाव
दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती_अमृत बन्सोड
–दलाई लामा यांचा 89 वा वाढदिवस
भारत तिबेट मैत्री संघ भंडारा यांच्यावतीने केला साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)केवळ तिबेट मुक्ती हेच दलाई लामा यांचे ध्येय नाही तर मानवी मूल्यांच्या संरक्षण व संवर्धना बरोबरच संपूर्ण विश्वात अहिंसा ,शांतता व सद्भावपुर्ण वातावरणाची निर्मिती करणे हे त्यांचे स्वप्न आहे भारतीय संस्कृतीची विशेषत: समृद्ध नालंदा संस्कृती व परंपरेचा ते जगभर प्रचार व प्रसार भारताला विश्वगुरू करण्याच्या दिशेने ते प्रयत्नशील आहेत .दलाई लामा यांच्या व्यक्तित्व ,कर्तृत्व व कृतीत्वाने पंचशील नेहमी प्रकाशित ,प्रचारीत व प्रसारित होत असल्यामुळे दलाई लामा पंचशीलाची जिवंत प्रतिमूर्ती आहेत ” असे मौलिक विचार भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य अध्यक्ष अमृत बन्सोड यांनी प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले.
ते भारत तिबेट मैत्री संघ भंडाऱ्याच्या वतीने आयोजित दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त वैशाली नगर येथील सत धम्म विहाराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते मन्साराम दहिवले उपस्थित होते .याप्रसंगी न.प. चे माजी उपाध्यक्ष आशु गोंडान्ने, मैत्री संघ राज्याचे महासचिव सचिन रामटेके, सामाजिक कार्यकर्ते महादेव मेश्राम, मैत्री संघ नागपूरच्या सचिव हर्षा पाटील, इंजि
रूपचंद रामटेके ,यांनी दलाई लामा यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकतानाच तिबेटच्या समस्येच्या समाधानाकरिता त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो म्हणून सदिच्छा प्रधान केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून ‘दलाई लामा अमर रहे ‘घ्या सामूहिक घोषणाही देण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी नोरगॅलिंग तिबेटन सेटलमेंट गोठणगाव येथे आयोजित सुंदर कार्यक्रमात केक कापून दलाई लामांचा जन्मदिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन भारत तिबेट मैत्री संघ भंडाराचे सचिव मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक अध्यक्ष गुलशन गजभिये यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रोशन जांभुळकर, रमेश जांगळे, राजकुमार बन्सोड , प्रशांत सूर्यवंशी, अहुजा डोंगरे , असित बागडे, अरविंद काणेकर, नागपूर मैत्री संघाचे अध्यक्ष अशोक धमगाये, राजेश हाडगे, सौ.हाडगे, टेंभुर्णीकर, प्रिया शहारे ,अनमोल देशपांडे, डी.सी. मेश्राम, पुष्पा रंगारी ,रमा गजभिये, हेमराज रंगारी ,देवराम मेश्राम, वाल्मीक डोंगरे, पी.जी.गवळीकर शुक्रध्वज घरडे, चंद्रिकापुरे ,सचिन गभणे, प्रशांत मेश्राम, रुकमांगन गोंधळे, नितेश शहारे, महेश मडके ,शुभम नगराळे, निलेश लोणारे, भास्कर सुखदेव ,अजय तांबे, इत्यादींची विशेष उपस्थिती होती.