Home गडचिरोली हत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट

हत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट

131

आशाताई बच्छाव

1000348088.jpg

हत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट

तीनही परिवारातील सदस्यांचे आस्थेने केले विचारपूस

गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

भामरागड तालुक्यातील कियर येथील गोगलू रामा तेलामी वय ५५ वर्षे यांनी गठ्ठा जंगलात चारोळी व मोहफूल गोळा करण्यास गेले असता रानटी हत्ती ने त्याच्यावर हल्ला करून ठार मारले.आणि हिदूर येथे लग्न कार्यक्रम मुळे माता मंदिरात पूजा करण्यास गेलेल्या तीन महिलावर सदर हत्तीने गंभीर हल्ला केल्याने उपचार दरम्यान राजे कोपा हलामी वय ५५ वर्षे आणि महारी देवू वड्डे वय ४७ वर्षे या महिला प्राण गमावले.
जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ अनेक दिवसापासून सुरु असल्यामुळे वन विभागाने सिरोंचं आणि आलापल्ली सारखे सावधानतेचा इशारा जर आपापल्या विभाग हद्दीत दिले असते तर हे हत्ती ने झालेला मृत्यू तांडव कदाचित घडला नसता.
तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून सिरोंचा विभागातील रेपणपली वन परीक्षेत्र जंगलात प्रवेश करताच सिरोंचाचे उपवनसंरक्षक व वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी हद्दीत येणाऱ्या सर्व गावात सावधान तेचा इशारा व धवनिक्षेपाने जंगलात न जाण्याचा आणि हत्ती विषय जनजागृत केल्याने त्या परिसरात कुठलीच हानी झाली नाही.
भामरागड वन विभागाच्या निष्काळजी पणामुळे हत्तीने निष्पाप लोकांचे बळी घेतले असल्याचे खंत युवा नेते संदीपभाऊ कोरेत यांनी व्यक्त केले.
कियर व हिदूर येथील हत्ती अपघातग्रस्त परिवाराला भेटी दरम्यान कोरेत यांनी परिवारातील सदस्यांना धैर्य देत अस्थेने विचारपूस केले.यावेळी भाजपचेभामरागड तालुकाध्यक्ष गावातील अर्जुन आलाम,विहिप विभाग सहमंत्री अमित बेझलवार,नागरिक व मृतकाच्या परिवारातील सदस्य उपस्थित

Previous articleनाशिकच्या आय.सी.आय.फायनान्स मध्ये धाडसी दरोडा सुमारे पाच कोटी लंपास
Next articleहत्तीच्या हल्ल्यात मृतकाच्या परिवाराला युवा नेता संदीपभाऊ कोरेत यांनी दिली सांत्वना भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.