आशाताई बच्छाव
भगुर प्रतिनिधी सुदर्शन बर्वे
– नाशिक ही संतांची भूमी असुन या ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्र यांचे चरणस्पर्श झाला आहे त्यामुळे या ठिकाणी अद्भुत असा देवभूमीचा वास असल्याचे जाणवते
गेले ३०० ते ४०० वर्षांपासून भगुर या गावात धुलीवंदन निमित्त वीर नाचवण्याची परंपरा आहे ही परंपरा फार जुन्या काळापासून भगुर या गावात सुरू आहे यात प्रामुख्याने तरुण पिढी आणि वयोवृद्ध तसेच लहान मुल सुध्दा यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात विविध प्रकारच्या वेशभूषा करून हि मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढली जाते यात संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात यात नागरिक होळीची राख एकमेकांवर उधळण केली जाते यात प्रामुख्याने १वर्ष ते १० वर्ष वयोगटातील मुलांना कोणी कृष्ण तर कोणी धोतर, सदरा, फेटे घालून सजवतात आणि मोठया थाटामाटात पारंपारिक पद्धतीने गावभर मिरवणूक काढून आजच्या दिवशी म्हणजे धूलिवंदन ला दरवर्षी मिरवतात
थोडक्यात वीर म्हणजे आपले कुटुंबीयातील पुर्वज असतात जे देवघरामध्ये एका चांदिच्या टाक स्वरूपात असतात