Home अमरावती महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार नेत्यांना धारा देणार नाही: ऑड. यशोमती ठाकूर...

महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार नेत्यांना धारा देणार नाही: ऑड. यशोमती ठाकूर यांची भाजप सह अशोक चव्हाण यांच्यावर टीका.

113

आशाताई बच्छाव

IMG_20240217_164856.jpg

महाराष्ट्रातील जनता भाजप आणि गद्दार नेत्यांना धारा देणार नाही: ऑड. यशोमती ठाकूर यांची भाजप सह अशोक चव्हाण यांच्यावर टीका.
————
दैनिक. युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री ऑड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे. मात्र भाजपने कितीही प्रयत्न केले, डबा टाकून नेत्यांना वाढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजपाने अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चित थारा देणार नाही असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. केंद्र सरकारने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या शोध पत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यापासून सातत्याने दवा होता मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅक मेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहेत काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेले काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चित आपल्याकडे दबाव टाकून ईडीसीबी आहे पक्षात घेऊ शकते. मात्र तमाम जनता जनार्दन नाही ही बाब निश्चित रुचणारी नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चित केला जाईल याची आम्हाला खात्री आहे अशी ही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. विकृत राजकारणाला आणि गद्दारी युतींना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी म्हटले की यापूर्वी मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन तिथल्या माळ्यावर चाल करून आली होती आम्हीच दाखवून आणि भीती दाखवून तिथल्या काही मनसे बगारांना आणि वतनदारांना मोघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते. देशासाठी स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला हे महाराष्ट्र विसरले नाही. आणि आगामी निवडणुकीत हे विसरणारे नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दारी युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थरा देणार नाही असे ऑड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. कार्यकर्त्यांची दांडगा संपर्क हेच अशोक चव्हाण यांचे बलस्थान: पहा त्यांच्या कारकिर्दीची आलेख; काँग्रेस करता धक्काच का मानला जातोय?

Previous articleअमरावती जिल्ह्यात सायत येथे लोखंडी बत्ता मारुन मुलाने बापाला जिवे मारले.
Next articleजरांगे पाटील यांना सर्मथन म्हणून उपोषणात- बालाजी पाटील बटाळकर .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.