Home नांदेड आखेर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लेंडी धरणग्रस्त संघर्ष...

आखेर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न

187

आशाताई बच्छाव

IMG_20231230_051846.jpg

आखेर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मागील 37 वर्षापासून प्रलंबित असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्ताने अखेर आपली समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. मुंबईत लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकार निश्चितपणे लेंडी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिष्टमंडळास दिला.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, शेतकरी संघटनेचे नेते मा.श्री . गुणवंतराव पाटील हागरगेकर मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर , सुरेश पंदिलवार, सुभाष अप्पा बोधने,लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, दिनेश आप्पा आवडके ,संदिप पाटील अतनुरे उमाकांतराव वाकडे, गुणवंतराव पाटील, मोतीराम आईलवाड ,महादेव आप्पा पंचडे बालाजी पाटील,निळकंठ पाटील देवकत्ते, एकनाथराव पाटील भाटापूरकर, आनंदराव येरेवाड, निळकंठ पाटील कोळनूरकर, शिवा पाटील भासवाडीकर सुधाकर पाटील हसनाळकर,, बाबुराव पाटील शेळके आदींची उपस्थिती होते
शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Previous articleलेंडी धरणग्रस्तांच्या लढ्याला व मागण्यांना लवकरच बळ मिळेल-मेधाताई पाटकर.
Next articleमहिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे.:- सौ. योगिताताई पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.