आशाताई बच्छाव
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व पीकविमा लवकर वाटप करण्यात यावे.
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
बिलोली तहसील कार्यालया समोर दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व पीकविमा वाटप करण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार निळे पाटील, नायब तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा.सुनिल एंबडवार, जिल्हा संघटक मा.विजय मुंडकर , युवा सेना जिल्हा प्रमुख माश्री बालाजी शिंदे नागणीकर उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर,जिल्हा समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य मा. नागनाथ वाडेकर, बिलोली तालुका प्रमुख मा.शिवकुमार बाबणे सगरोळीकर , बिलोली तालुका संघटक व्यकट गुज्जरवाड,रमेश देशमुख, बाळा गुज्जरवाड, प्रल्हाद कदम, कोंडीबा म्हेत्रे, बिलोली शहर प्रमुख शिवकुमार पटणे, कोंडलवाडी शहर प्रमुख , शंकर कोनेरवार प्रशांत वानोळे , खानापूर उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे लख्खेकर आदी प्रमुख पदाधिकारीसह शिवसैनिक , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते






