आशाताई बच्छाव
विवाहितेला ५० हजारांसाठी मारहाण करत छळ ;
जळगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!
योगेश पाटील, जळगाव.
कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी मारहाण करत छळ केल्याच प्रकार गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आला आहेत.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई मुकेश कोळी (वय-३२) यांचा
विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी रिती रिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे १५ दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही याचा राग मनात धरून विवाहितेला शिवीगाळ करत “पैसे आणले नाही तर तू कशी नांदते आम्ही बघतोच” अशी धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी झाला.लग्नानंतर १५ दिवसांनी विवाहितेकडे पैशाची मागणी करीत तिचा छळ केला जाऊ लागला. वारंवार शिवीगाळ करीत मारहाण होत असल्याने विवाहिता माहेरी निघून आली.
याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मुकेश कोळी, सासरे दगा कोळी, सासू चंद्रभागा कोळी, मावस सासरे जगन सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.






