Home नाशिक स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आपले गाव आपला परिसर……..

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आपले गाव आपला परिसर……..

152

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0032.jpg

युवा मराठा न्यूज नयन शिवदे
स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आपले गाव आपला परिसर……..
स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरचे अभियान आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोंबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत हे अभियान सुरू केले.
आपला भारत देश स्वच्छ व निरोगी बनवणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न होते.
म्हणून महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्म शताब्दी निमित्त म्हणजे दोन ऑक्टोंबर 2019 पर्यंत भारत देश स्वच्छ करायचा हा निर्णय सरकारने घेतला.
स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे मोदींजीनी व्यक्त केले.
या अभियानाचे नेतृत्व करताना महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असे आवाहन जनतेला करण्यात आले.
या मोहीम मुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आणि लोकांनी स्वतः हून साप सफाई सुरू केली
या स्वच्छते अंतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे स्वच्छता ग्रहाची स्वच्छता रस्त्याची स्वच्छ ता ओला कचरा सुका कचरा कचऱ्याची स्वतंत्र साठवणूक असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.
जेव्हा आपण भारताला स्वच्छ आणि निरोगी करू तेव्हाच स्वच्छ भारत अभियान चे खरे सार्थक झाले असे म्हणता येईल
म्हणून ठेंगोडा येथे स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत आपले गाव आपला परिसर स्वच्छ करायचा असून सर्व ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक आणि अंगणवाडी बचत गट तसेच जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय आरोग्य विभाग महसूल विभाग कृषी विभाग या सर्व विभागातील कर्मचारी यांनी दिनांक 1 10 2023 रोजी. सकाळी ठीक 10.00. वाजता ठेंगोडे गावात स्वच्छता अभियान ही सेवा राबवण्यात आली.

Previous articleगुरुकुल विद्यालय भातकुली येथे केंद्र भातकुली ची शिक्षण परिषद संपन्न.
Next articleचाळीसगाव महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.