आशाताई बच्छाव
जिल्हा काँग्रेसची 18 जून रोजी
महत्वपुर्ण बैठक ः राजाभाऊ देशमुख
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार संपर्क अभियाना अंतर्गत ग्रामिण आणि शहरी भागातील मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आणि कॉंग्रेस कमिटीची स्थापना करण्यासाठी राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाचे राज्य समन्वयक म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यामध्ये जिल्हा ब्लॉक, ग्राम स्तरावर व सर्व शहरामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या संदर्भातील कालबध्द कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. अशी माहिती जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे.
मतदार संपर्क अभियाना अंतर्गत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 18 जून रविवार 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री गुरू गणेश भवन येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक जिल्ह्याचे प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल, सह प्रभारी ॲड. अनिल मुंढे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून ते बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. मतदार संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेेते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, आर. आर. खडके, सरचिटणीस कल्याण दळे, राजेंद्र राख, प्रा. सत्संग मुंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या महत्वपुर्ण बैठकीस जालना जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी जि. प., न. प., पं. स. सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.