आशाताई बच्छाव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा पालघर,(वैभव पाटील युवा मराठा न्युज)
भारतीय संविधान आणि घटनाकार प.पु.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संपूर्ण भारतभर २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा सुवर्ण महोत्सव वर्ष पूर्ण होत असताना इतकी वर्षे उलटून गेली तरी आपल्या भारतीय संविधानाने २९राज्य,१०धर्म,७५०० जाती,३००० भाषा,हजारो संस्कृती,पंथ,४५ कोटी कुटुंब,१३६ कोटी लोकसंख्येला गेल्या अनेक वर्षांपासून एकाच धाग्यात गुंफून ठेऊन देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचे महान कार्य केले आहे. ज्याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला जाते.आणि त्याच अनुषंगाने आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.रिपाई(आ) च्या वतीने पालघर तसेच बोईसर असलेल्या डॉ.आंबेडकर चौकाला मानवंदना देण्यात आली व सामुदायिक रित्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले तसेच २६ /११ रोजी मुंबई वर झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले जे जवान,पोलीस अधिकारी,कर्मचारी शाहिद झाले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या समयी रिपाई(आ) पालघर जिल्हा – अध्यक्ष आयु.सुरेश जाधव यांनी तमाम भारतवासीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संविधानाचे महत्त्व काय आहे ते आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले. यावेळी पालघर ,नवीन भाई त्रिपाठी(उपाध्यक्ष पालघर जिल्हा),कुंदन मोरे(उपाध्यक्ष पालघर जिल्हा),रोहिणीताई गायकवाड(महिला आघाडी अध्यक्षा पा.जि), राजकुमार यादव(संघटक पा.जि), पुष्पराज भाई फुलारा(संघटक पा.जि), नरेंद्र करणकळे(पा.ता.अध्यक्ष),शरद जाधव(युवा अध्यक्ष पा.ता. ),राम ठाकूर(उपाध्यक्ष पालघर शहर),सचिन घाडीगांवकर(संघटक पा.शहर),रोशन पाटील( जेष्ठ काँग्रेस ने�