Home बुलढाणा ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मंजूर न झाल्यास संग्रामपूर तालुक्यात काम बंद आंदोलन...

ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मंजूर न झाल्यास संग्रामपूर तालुक्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा.!

132

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0025.jpg

ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मंजूर न झाल्यास संग्रामपूर तालुक्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा.!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

ग्राम रोजगार सेवक हे अल्प मानधनावर ग्राम पातळीवर गेल्या पंधरा वर्षापासून काम करीत आहेत त्या अनुषंगाने ग्राम रोजगार सेवक शासन प्रशासन यांच्या अधिपत्याखाली वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करीत असतात.
तरीपण सदर कामाचा पाहिजे तसा मोबदला देण्यात येत नाही. आणि पूर्णवेळ काम करून सुद्धा त्याला शासन निर्णयानुसार अर्धवेळ धोरणात येत असून अशा प्रकाराची आमची पिळवणूक होत आहे. त्याकरिता ग्राम रोजगार सेवकांना दोन मे 2011 च्या शासन निर्णयात सुधारणा करून पूर्णवेळ करण्यात यावे.व ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.आणि ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मानधनासह तांत्रिक व मनरेगाचे कामे करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल नेट पॅक सह देण्यात यावा
तसेच ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता अल्पाहार पत्ता व स्टेशनरी खर्च देण्यात यावे अशा मागण्या महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटना संग्रामपूर तालुक्याचे वतीने करण्यात आल्या असून दिनांक 4 डिसेंबर 2022 च्या अगोदर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 5 डिसेंबर 2022 पासून संग्रामपूर तालुक्यात काम बंद आंदोलन करण्यात येईल.असा इशारा तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघटना संग्रामपूर तालुका अध्यक्ष राहुल मेटांगे व इतर रोजगार सेवकांनी दिला असून यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने रोजगार सेवक उपस्थित होते.

Previous articleपरमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विदयालयात संविधान दिन उत्साहात साजरा.
Next articleई पास मशीन कायमस्वरूपी शासनास परत करण्याची संग्रामपूर तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.