आशाताई बच्छाव
अतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा.
दिनेश आवडके
मुक्रमाबाद प्रतिनिधी/बस्वराज स्वामी वंटगिरे(युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या दोन महिन्यांपासून होत असल्येल्या संततधार व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काडत असतान परतीच्या पावसाने थैमान घातले असून मुक्रमाबाद परीसरात पंधरा दिवसांपासून एक दिवस आड मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुक्रमाबाद परीसरात सुरवातीला कमी पाऊस झाला होता परंतु मध्येंतरी ऐन मुग, उडीद, सोयाबीन पिके काढणीच्या वेळेस पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांची नगदी पिके वायाला गेली आहेत.आज घडीला शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत. तात्काळ पंचनामे केल्यास खरी परिस्थिती प्रशासनासमोर येईल त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. तरी महाराष्ट्र शासनाने कसलाही विलंब न करता शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावी.
शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढून ठेवल्याने सोयाबीनला मोड फूटले आहेत.परीसरात पावसाने कहर घातला आहे.ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हीरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या परीस्थितीत पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाला शासनाने सूचना देऊन पंचनामे करावे असे आवाहन काॅग्रेसचे युवा नेते दिनेश आवडके यांनी करीत आहेत.