Home नांदेड अतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा. दिनेश आवडके

अतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा. दिनेश आवडके

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20221024-WA0043.jpg

अतिवृष्टीचे पंचनामे करून ओलादुष्काळ जाहीर करा.
दिनेश आवडके
मुक्रमाबाद प्रतिनिधी/बस्वराज स्वामी वंटगिरे(युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या दोन महिन्यांपासून होत असल्येल्या संततधार व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काडत असतान परतीच्या पावसाने थैमान घातले असून मुक्रमाबाद परीसरात पंधरा दिवसांपासून एक दिवस आड मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुक्रमाबाद परीसरात सुरवातीला कमी पाऊस झाला होता परंतु मध्येंतरी ऐन मुग, उडीद, सोयाबीन पिके काढणीच्या वेळेस पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांची नगदी पिके वायाला गेली आहेत.आज घडीला शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत. तात्काळ पंचनामे केल्यास खरी परिस्थिती प्रशासनासमोर येईल त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. तरी महाराष्ट्र शासनाने कसलाही विलंब न करता शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावी.
शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढून ठेवल्याने सोयाबीनला मोड फूटले आहेत.परीसरात पावसाने कहर घातला आहे.ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हीरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या परीस्थितीत पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाला शासनाने सूचना देऊन पंचनामे करावे असे आवाहन काॅग्रेसचे युवा नेते दिनेश आवडके यांनी करीत आहेत.

Previous articleजिनियस इंग्लिश स्कूलने जपली सामाजिक बांधिलकी.
Next articleगावातील दिवाळी! बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here