आशाताई बच्छाव
बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीच्या
पूराचे पाणी . बा-हाळी –देगलूर मार्गावरील वाहतूक ठप्प.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बा-हाळी-
गेल्या आठ दिवसापासून बा-हाळी परीसरात पडत असलेल्या पावसाने आता नदी नाले ओसंडून वाहत असून छोट्या मोठ्या नद्यांना पूर येत आहे.बा-हाळी नजीक असलेल्या पूलावरुन कूंन्द्राळा नदीचे पाणी वाहत असल्याने आज सकाळ पासून जवळपास। १० ते १५ गावांचा बा-हाळीशी असणारा संपर्क तुटला आहे.
परीसरात गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सूरु आहे. लहान मोठ्या नदी नाल्यांना आता पूर येण्यास सुरुवात झाली आहे ,कूंन्द्राळा नदी त पाणी वेगाने वाढत असल्याने बा-हाळी देगलूर मार्गावरील पूलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कबनूर,माकणी,वसूर,सकनूर,बिल्लाळी,जाहूर,येवती,देगलूर सह अनेक वाडी तांड्यांचा बा-हाळीशी असणारा संपर्क तूटला आहे.
गेल्या वर्षी महापुराणे सदरील पूलावरील डांबरी व सिमेंट रस्ताच वाहून गेला होता .अनेकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती पण त्या कडे दूर्लक्ष करीत मूरुम टाकून वाहतूक सूरळीत केली होती.
वाहनचालकांनी तथा प्रवाशांनी पूराचे पाणी ओसरल्यावरच सूरक्षीत पणे पूढील प्रवास करावा, शेतकऱ्यांनी आपले पाळीव जनावरे नदीच्या काठावर बांधणे टाळण्याचे आवाहन मूक्रमाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी केले आहे.