Home नांदेड शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू

शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू

177

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0031.jpg

शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शेतकरी स्वतःच्या शेतातील केरकचरा वेचण्यासाठी निळेगव्हाण शिवारात गेले होते. त्यांचा विद्युतप्रवाह असलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने ते जागीच दगावल्याची घटना घडली असून याबाबत कुंटूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील शेतकरी विश्वंभर माणिकराव चेरकेवाड वय ६० हे स्वतःच्या निळेगव्हाण शिवारातील शेतातील केर कचरा वेचून बाहेर काढण्यासाठी शेतात गेले होते, शेताला आसलेल्या काटेरी कुंपणात विद्युतप्रवाह उतरल्याने व विश्वंभर चेरकेवाड यांचा विद्युतप्रवाह असलेल्या काटेरी कुंपणाला हाताचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून ते जागीच मरण पावल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजी दुपारी घडली

सदरची दुर्दैवी घटना अचानक घडली असल्यामुळे घडलेल्या घटनेमुळे कृष्णूर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात. असून सादरील घटनेचा पंचनामा करुन कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार एस एम कुमरे व पॉका अशोक घुमे यांनी केला. विश्वंभर यांच्या पश्चात तीन मुल व पत्नी असल्याचे गावकऱ्यानी सांगितले आहे.

Previous articleपिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवराज्याभिषेक उत्सव साजरा.
Next articleअमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत संग्रामपुर तहसील येथे कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.