राजेंद्र पाटील राऊत
कर्नाटक व महाराष्ट्र सरकार निर्लज्यपणाचा कळस.! पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ….!
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी राजकारण एक सर्कस बनऊन ठेवली आहे. ज्याचा प्रत्यय आपल्याला राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी,अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना आणि एकड्या लग्न समारंभासाठी एकत्र भेटताना हास्य संवाद ,करताना पाहताना दिसतात.
परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचे प्रकार महाराष्ट्रात २ वेळा आणि शेजारील कर्नाटक राज्यात १ वेळा झाल्याची घटना घडली आहे.
परंतु दोन्ही राज्य सरकार ने गंभीर दखल घेतलेली नाही. गेल्या
१. ऑक्टोंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वलसत चे आमदार राजू नवघरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार घालून महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती.
२. नोव्हेंबर महिन्यात जालना जिल्हा मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार छाटून टाकले होती.
ह्या दोन्ही घटनांचा निषेध राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ, मुंबई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृह मंत्री यांना थेट पत्राद्वारे विचारणा केली होती परंतु अजूनही कोणतीच करवाई झालेली दिसली नाही.
आज शेजारील कर्नाटक राज्यात बंगलोर शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी तरी चेहऱ्याला काळे लावले आहे.
परंतु दोन्ही राज्य सरकार यांनी काहीच गंभीर दखल घेतली नाही,आता महाराष्ट्र सरकार सारखेच शेजारील कर्नाटक सरकार देखील असेच हे प्रकरण निर्लज्यपणा दाखवत पाहत बसणार की संबंधितांवर कठोर करवाई करणार हे पाहणे आवश्यक झाले आहे.