राजेंद्र पाटील राऊत
लोहा तहसील कार्यालयात दिव्यांगाना आत्महत्या करण्याची वेळ आणली
___________________________
अशा दोषी अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करा?
___________________________
मा पंतप्रधान साहेब , मुख्यमंत्री साहेब यांना _दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोर पाटिल कुंचेलीकर शिष्टमंडळ यांनी दिले
_________________________
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
___________________________
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यात शेकडो आंदोलन दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदैड जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेत असलेल्या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग बांधवांनी सर्व तहसिलदार साहेब यांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन, व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन करून न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलने करून न्याय मिळत नसेल तर दिव्यांगाना स्वईच्छा मरण्याची मरण्याची परवानगी मिळावी म्हणून आताचे जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या कार्यालयासमोर दि २४ जाने २१ ते २५ जाने २१ला १८० दिव्यागानी बेमुदत धरणेआंदोलन वारंवार निवेदन करून सुध्दा न्याय मिळत नसल्यामुळे दि २८जुन २१ पासुन ९ जुलै २१ पर्यंत प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर शासन प्रशासनास जागे करण्यासाठी थालीनांद आंदोलन चालू असताना शासन प्रशासन गांभीर्याने दिव्यांगाच्या प्रश्न न सोडवत नसल्यामुळे आज *दिव्यांग बांधव लोहा तहसील कार्यालयात उमरा येथील दिव्यांग शेतमजुर भिमराव चपती सिरसाठ या बांधवांने तहसील कार्यालयातच आत्महत्या करण्याची वेळ प्रशासनानि आणली अशा दोषी अधिकारी यांच्यावर दिव्यांग कायदा २०१६ व दप्तर दिरंगाई व दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवणार्या दोषी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी,
दिव्यांग बांधवाच्या कुंटुबात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील,भाऊ असा परिवार असुन मोलमजुरी करतात मयत कुंटुबाच्या मुलीस दतक घेऊन आर्थिक सहाय्य व त्यांच्या कुटुंबीयांचे त्वरीत पुनर्वसन करावे.
भविष्यात या पुढे जर केंद्र व राज्य शासनाच्या व प्रशासनाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजी मुळे महाराष्ट्रात एकाही दिव्यांगाची आत्महत्या झाली तर कायद्याची पर्वा न करता महाराष्ट्रात दिव्यागं आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही .असे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ,जी अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, गजानन हंबर्डे, दताञय सोनकांबळे, बालाजी क्षीरसागर, ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले यांनी प्रसिद्ध पञक दिले