Home पुणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी...

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी! आठवडे बाजार देखील बंद..

174

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी! आठवडे बाजार देखील बंद….! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕पुणे शहरा पाठोपाठ जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली असून, आजपासून 9 एप्रिल पर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील दिवसा जमावबंदी, तर संध्याकाळी संचारबंदी लागू राहणार आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड केला जाणार असून, जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडी बाजार शासनाने रद्द केले आहेत.जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर पुणे शहरात लागू केलेल्या सर्व उपाययोजना पुणे जिल्ह्यातही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन एप्रिल पासून 9 एप्रिल पर्यंत हा आदेश लागू होत असून सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा अशा बारा तासाच्या वेळेत पूर्णतः रस्त्यावर आणि गावांमध्ये जमावबंदी व संचारबंदी राहील. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृह, व्यायाम शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

मात्र हॉटेलमधून पार्सल सेवा पुरवता येईल.त्याचबरोबर तीन एप्रिल पासून पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नगरपरिषदांच्या हद्दीतील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभा-संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन अशा, ज्या ठिकाणी अधिक लोक एकत्र येऊ शकतात ते सर्व कार्यक्रम बंद राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी अथवा खाजगी वाहनातून प्रवास करताना देखील मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. येत्या नऊ एप्रिल पर्यंत ही उपाय योजना लागू राहणार आहे.⭕

Previous articleरामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
Next articleस्वर्गीय दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.