पेठ वडगांव : नरंदे येथील श्री.प्रकाश कदम (वाहक) आज इचलकरंजी आगारामध्ये सलग १५ वर्षे सेवा बजावून सेवा निवृत्त झाले.
आज ते संपूर्ण कोल्हापूर विभागात एकटेच प्रकाश कदम सेवा निवृत्त झाले आहेत.
कदम हे मूळचे नंरदे ता.हातकणंगले येथील रहीवाशी आहेत .ते एसटी महामंडळामधे १९८८ साली रूजू झाले त्यावेळी त्याना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारामधे नोकरी करण्याची संधी मीळाली त्यांनी सलग १८ वर्षे दापोलीत नोकरी केली , त्यानंतर ते इचलकरंजी आगारामधे बदलुन आले ते एसटी कर्मचाऱ्यांना नेहमी वैद्यकीय बिलाची मोफत कामे करून देत होते तसेच इतर कर्मचाऱ्यांना अडीअडचणीत नेहमी मदत करत होते.
त्यांनी १९८८ ते २०२१ पर्यंत एकूण ३२ वर्षे प्रामाणिकपणे एसटी ची नोकरी केली.
आज सेवानिवृत कदम (वाहक) यांचा सत्कार करताना आगार व्यवस्थापक संतोष बोगरे ,चालक जावेद बागवान , राहुल आरगे , बी.ए.घोरपडे, जे.आर.पाटील ,उमेश मोहीते ,दिपक सवाईराम , राजू तळंदगे , मोतीलाल जमादार , श्रीकांत जाधव, सौ.सारीका जाधव आणि इचलकरंजी आगारातील चालक ,वाहक, यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते.
संकलन- मोहन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क