Home माझं गाव माझं गा-हाणं नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत

नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत

182

राजेंद्र पाटील राऊत

नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत
कृषीमंत्री दादाजी भुसे                                                       मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगांव महानगपालिकेच्या मुलभूत सुविधांअंतर्गत रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणी पुरवठा आदी कामकाजाचा आढावा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं. 1 येथील कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.

शहरात महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी नियोजित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्रीमहोदय श्री. भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

रस्ते दुरुस्ती व स्वच्छता संदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात यावा,तसेच शहरातील आग्रा रोड, कॅम्प रोड, सटाणा रोड, स्वच्छ करणे व काटेरी झुडपे काढण्यासाठी मदत लागल्यास दोन जेसीबी उपलब्ध करुन कामांचा निपटारा लवकरात लवकर करावा.

बंद अवस्थेतील पथदिवे हे येत्या दहा दिवसात दुरुस्ती करून चालू करावेत. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे विकास कामे दर्जेदार पद्धतीने करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश श्री. भुसे यांनी यावेळी दिलेत.

कोविड-19 लसीकरणाबाबत सविस्तर माहिती यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. लसीकरणानंतरही आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.मालेगाव तालुक्यातील सर्व महानगर पालिका आयुक्त व कर्मचारी हजर होते

Previous articleसरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार
Next articleकामातुरांण भय न लज्जा पुरोगामी महाराष्ट्र हादरला!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.