🛑 मोफत रेशन घेण्यासाठी…..! लागणार नाही रेशनकार्ड :-
सरकारने बदलले नियम 🛑✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
नवी दिल्ली :⭕रेशन कार्डला आधार लिंक करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. मोदी सरकार या दिशेने काम करत आहे. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर ग्राहकांना रेशन दुकानांवर रेशनकार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही. रेशनकार्ड क्रमांकासह दुकानदार धान्याचा वाटा ग्राहकांना देईल. लॉकडाउनची अंमलबजावणी केल्यानंतर केंद्र सरकारने रेशनकार्ड नसलेल्या अशा लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. दिल्लीसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या आदेशाचे अनुसरण करीत रेशनचे विनामूल्य वितरण करीत आहेत. ही योजना पहिले तीन महिन्यांसाठी लागू केली गेली, परंतु नंतर केंद्र सरकारने त्यास नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, असे असूनही त्या लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळी दिली जात आहेत, परंतु सरकारची ही योजना केवळ नोव्हेंबरपर्यंतच आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यानंतरही ज्या लोकांना रेशनकार्ड आधारशी जोडले गेले आहे त्यांना रेशन कार्ड नसतानाही रेशन मिळणार आहे..
पंतप्रधान मोदींनी 30 जून 2020 रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात, देशातील सण आणि आगामी काळात होणाऱ्या उत्सवांचा विचार करता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKY) पुढील 5 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याअंतर्गत, देशातील 80 कोटीहून अधिक NFSA लाभार्थी दरमहा पात्रतेव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो हरभरा प्रदान करत आहेत….⭕