आशाताई बच्छाव
राधिकाताई चिंचोलीकर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित!
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील सामाजिक क्षेत्रातील आग्रेसर आसनार्या मानवी हक्क आभियानाच्या महिला आघाडीच्या नेत्या राधिकाचिचोलीकर यांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेहमिच महिलांच्या प्रश्नावर, अन्याय -अत्यारा विरोधातील लढ्यात ,प्रखर भुमिका मांडत त्यांनी आपला लढा कायम ठेवुनी अनेक भुमिहीन गायरानधारक यांच्या साठी,काम केले आहे एकुणच वंचित घटकांसाठी काम करणार्या नेहमी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदानाची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने व सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने साधुन नांदेड येथे अण्णा भाऊ साठे पिंपल्स फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक: २६ जून रोजी नांदेड शहरातील रूबी हॉटेल येथे आयोजित एका विशेष समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवी हक्क अभियानाच्या महिला जिल्हाध्यक्षा राधिका ताई चिंचोली कर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राधिका ताई चिंचोली कर यांना राज्य शासनाच्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्कारासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यामुळे राधिका ताई चिंचोली कर यांचा विविध स्तरातुन कौतुकाची थाप पडली आहे त्यामुळे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.






