आशाताई बच्छाव
ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –राज्य शासनाच्या ऑटो रिक्षा खुले परवाना धोरणामुळे जालना जिल्हा सहित संपूर्ण राज्यात री क्षांची संख्या अमर्यादित होऊन व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण होऊन बेरोजगारी वाढलेली आहे जीवनावश्यक वस्तू रिक्षांची सुटी भाग पेट्रोल गॅस इत्यादींच्या किमतीत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होऊन व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका भागविणे अवघड झालेले असताना राज्य शासनाने एक लाखापेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरू करण्याचा अध्यादेश काढून जखमी पेक्षा चालक मालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे या निर्णयामुळे रिक्षा चालक बेरोजगार होण्याची व त्यातून शहरात गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त करीत ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती शाखा जालनाच्या वतीने या योजनेस तीव्र विरोध केला आहे तसेच आगामी काळात दुचाकी टॅक्सी सेवेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात येत आहे राज्य शासनाने रिक्षा चालकांच्या वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा मुलांच्या शिक्षणाबाबत योजना निवृत्तीवेतन आधीचा लाभ मिळण्यास तो धर्मवीर आनंदी घे रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेचा निर्णय दोन वर्षांपूर्वी जाहीर केला प्रत्यक्षात मात्र जालना जिल्ह्यात या मंडळाच्या संदर्भात सदस्य नोंदणी देखील सुरुवात न झाल्याने चालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे सध्या परिस्थितीचा शासनाने गंभीरतेने विचार करून रिक्षाचालक मालकांचा निम्न प्रमुख मागण्याकडे लक्ष केंद्रित करून रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






