Home नांदेड अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

165

आशाताई बच्छाव

1001542706.jpg

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

 

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड तालुक्यात बेमोसमी अवकाळी पावसाच्या पाण्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून जीवित हानी होऊन शेतकऱ्यांच्या अनेक जनावरे दगावलेली असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी. मुखेड तालुक्यात व परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सतत धार पाऊस सुरू आहे बेमोसमी आलेल्या पावसामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. दिनांक 27 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुखेड तालुक्यातील चांडोळा, केरूर ,होनवडज ,जांभळी, तांदळी ,बिल्लाळी ,अशा अनेक गावातील जनतेचे व शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे सध्या शेतकऱ्याचे मोसंबी पेरू उन्हाळी हायब्रीड भुईमुगाचे पीक तोंडावर आलेले असताना या बे मोसमी पावसामुळे हातात तोंडाशी आलेल्या घास हिसकावून घेण्यात आला सारखे पावसामुळे पूर्णपणे नासाडी झालेली आहे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मोटारी शेतातील पाईप ही पुराच्या पाण्यात वाहून जाऊन खूप मोठे आर्थिक नुकसान झालेली आहे आज घडीला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी मा तहसीलदार साहेबांनी सदरील पूरग्रस्त गावातील संपूर्ण शेतकऱ्याचे पंचनामे करून झालेल्या नुकसानी बदल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर करावे.
यावेळी उपस्थित
सचिन पाटील इंगोले
गिरीधर पाटील केरूरकर
नागेश पाटील शिंदे, वीरभद्र आप्पा स्वामी, अमोल जी मोरे, राजू पाटील दुरनाळे ,सय्यद मोहम्मद रफीक ,विनायक पाटील इंगळे ,अर्जुन सोनकांबळे आदी शेतकरी उपस्थित होते

Previous articleरामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती सद्गुरु व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना
Next articleस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ जयंती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.