Home बुलढाणा मेहकर तालुक्याला अवकाळीने झोडपले; विजांचेही तांडव ! झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतकऱ्यावर वीज...

मेहकर तालुक्याला अवकाळीने झोडपले; विजांचेही तांडव ! झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली; जागीच मृत्यू ! चायगावची घटना

29
0

आशाताई बच्छाव

1001509976.jpg

मेहकर तालुक्याला अवकाळीने झोडपले; विजांचेही तांडव ! झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली; जागीच मृत्यू ! चायगावची घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मेहकर नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने काल, १४ मे साठी बुलढाणा जिल्ह्याला ऑरेंज साठी बुलढाणा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाट होईल असे अंदाजात म्हटले होते. हा अंदाज खरा ठरला. मेहकर तालुक्यातील नायगाव, दत्तपूर, जानेफळ भागात काल दुपारी तुफान वादळ आले. विजांच्या तांडावर एका शेतकऱ्यावर वीज
कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना चायगाव येथे घडली. अर्जुन कुंडलिक रोही (७५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे..
अर्जुन रोही पत्नीसह शेतात होते. वादळी वारा आणि पाऊस सुरू झाल्याने ते आंब्याच्या झाडाखाली थांबले. त्यावेळी झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली बसलेल्या अर्जुन रोही यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतक अर्जुन रोही यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काल झालेल्या वादळी पावसाने परिसरात लग्न मंडपांची देखील दाणादाण उडाली. उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले..

Previous articleसंतापजनक.. जिल्हा हादरला! साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ! चिकन सेंटर मध्ये पिंपळगाव राजाचा रेहान खान ने केले पाप…..
Next articleBREAKING आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल ! तलवार फिरवणे अंगलट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here