Home बीड महावितरणने चालवलेला विजेचा लपंडाव केव्हा थांबणार?सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांचा सवाल

महावितरणने चालवलेला विजेचा लपंडाव केव्हा थांबणार?सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांचा सवाल

65
0

आशाताई बच्छाव

1001340660.jpg

महावितरणने चालवलेला विजेचा लपंडाव केव्हा थांबणार?सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांचा सवाल

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि.२१ मार्च २०२५ परळी शहरात गेल्या महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, यामुळे नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी केला आहे.
परळी शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वीज गेल्यानंतर दोन-दोन तास परत येत नाही. आली तरी किती वेळ टिकेल, याचा काहीही भरवसा नाही. या अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः आईस्क्रीम, हॉटेल व इतर विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.” तसेच, नागरिकांकडून भरमसाठ वीजबिले आकारली जात असताना, त्यांना २४ तास वीजपुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. महावितरणचे वीज वितरण वेळापत्रक संपूर्ण कोलमडले असून, वीज केव्हा जाईल आणि केव्हा येईल, याचा काहीही ठावठिकाणा नाही.
“महावितरणने त्वरित हा विजेचा लपंडाव थांबवावा, अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही अँड. मनोज संकाये यांनी दिला आहे.
नागरिकांची मागणी – वीजपुरवठा सुरळीत करावा
परळीतील नागरिकांनी महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध नोंदवत, विजेचे वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आगामी काळात याविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleअहिल्यानगरमध्ये पार्किंगच्या वादातून एकाला मारहाण
Next articleआरोग्यदायी समाज निर्मितीमध्ये रुग्ण सेवा मंडळाची भूमिका महत्वपूर्ण –डॉ. शंकर लेखणे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here