Home नांदेड मुक्रमाबाद येथे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात

मुक्रमाबाद येथे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात

114

आशाताई बच्छाव

1001229235.jpg

मुक्रमाबाद येथे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात केली आहे. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पणे ठरविल्याप्रमाणे हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सुरूवात करण्यात आले आहे. हत्ती रोग हा कुवेक्स( culex) नावाच्या डास चावल्यानंतर हत्तीरोग होण्यासाठी ५ ते १५ वर्ष लागतात. याच काळात आपण अल्बेन्डाझोल (Albendazde) व डी.इ.सी ( dec ) या दोन गोळ्या वर्षांतून एकदाच खाल्याने हत्तीरोग दूरीकरण नायनाट होण्यास मदत होत. तर हत्तीरोग ( Lymphatic Filariasis ) च्या नावाचे जंत मरतात व त्या व्यक्तीला हत्तीरोग होत नाही. तसेच यामध्ये २ वर्षांखालील बालके, गरोदर माता, अतीगभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींना वगळून घरातील सर्व सदस्यांनी गोळ्या खाव्या व हत्तीरोगाला पळवून लावावे. मुक्रमाबाद शहरातील खाजगी डॉ संजयकुमार गुजलवार यांनी स्वतः गोळ्या खावून या हत्तीरोग दूरीकरण मोहीमेस सहभाग नोंदविला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला १० फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत मोहीम घरोघरी जाऊन यशस्वी केली जात आहे. घरोघरी जाऊन गोळ्या हे गावातील आशासेविका देत आहेत. तरी यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ महेश खेंगटे, एस.बी.पांचाळ, एम.पी.डब्लू शेख एस.एम, सुनंदा दामेकर,सुपरवाझर उज्वला कांबळे, आशासेविका सुप्रिया (खंकरे)गोगे, पुजा बोधने,प्रतिभा गुमडे अंगणवाडी सेविकासह अनेक कर्मचारी परीश्रम घेत आहेत

Previous articleकॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन मध्ये वळग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ५ क्रमांक
Next articleस्वर्णलता राऊत यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.