आशाताई बच्छाव
बीड शहरच्या रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारीला रेल्वे येणार म्हणजे येणार – खा. बजरंग सोनवणे
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि. ३१ डिसेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील जनतेने पाहिलेले रेल्वेचे स्वप्न ५० वर्षानंतर सत्यात उतरताना दिसत असून, अहमदनगर – बी – परळी रेल्वे मार्ग आता पूर्णतत्वाच्या दिशेने दिसत आहे. यापूर्वी अहमदनगर ते विघनवाडी (ता. शिरूर का.) पर्यंत रेल्वे चाचणी झाली होती. या मार्गावर काही दिवस रेल्वे धावलीही पण बीड तालुक्यात रेल्वे कधी येणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी दि. ३० डिसेंबर हा दिवस उजाडला आणि बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे रेल्वे दाखल झाली. विघनवाडी ते नवगण राजुरी पर्यंत हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली. यावेळी खा. बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती. त्यांनी यावेळी रेल्वे इंजिनचे पूजन करून हिरवी झेंडी दाखवून चाचणी घेण्यात आली. यामुळे माध्यमांशी बोलताना खा . बजरंग सोनवणे म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून, बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे कृती समितीने खूप मेहनत घेतली, लढा दिला हे त्याचे फलित असून, कृती समितीचे आभार मानले. तर बीड जिल्ह्याचा खासदार होऊन मला सहा महिने झाले. माझ्या या सहा महिन्यांच्या कार्यकाळात ६० कि. मी. काम पूर्ण केले. आज विघनवाडी ते नवगण राजुरी हाय स्पीड चाचणी पूर्ण झाली. आता केवळ बीड १० कि. मी. अंतरावर असून हे काम महिन्याभरात पूर्ण करून येत्या २६ जानेवारी २०२५ पर्यंत काम पूर्ण करून बीड शहरच्या स्टेशनवर रेल्वे येणार म्हणजे येणार असा विश्वास व्यक्त केला. आजचा हा दिवस आनंदाचा असल्याचे म्हटले तसेच रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले.






