आशाताई बच्छाव
पश्चिम विदर्भातील वास्तव: ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास: अस्मानी, सुलतानी संकटाचे रोज तीन बळी
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहे. यंदाच्या सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कंवटाळले. यामध्ये सर्वाधिक १७० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेला आहे. शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दर दिवशी ३ शेतकरी अस्मानी सुलतान संकटाला बळी ठरले आहे. दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपणा यासह अन्यकारणामुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण१४ अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या ची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २०,५१६ प्रकरणामध्ये शासन मदत देण्यात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयांनी दिली. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्यक्ष प्रत्येक राज्यकर्त्याद्वारे करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासन निर्णय चा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याने, मृत शेतकऱ्यांच्या वर्षाला मिळणाऱ्या एक लाखाच्या शासन मदतीच्या निकाशात१९ वर्षापासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.सन २००१स्थीती एकूण शेतकरी आत्महत्या २०६३०, शासन मदत प्राप्त प्रकरण ९५१६, विविध कारणांनी नाकारली १०६७६, चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे ३०६ अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारण मी माणसं जिल्हा प्रशासन ने केलेली नाही. शेतकरी आत्महत्या चा क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र पुढे काहीच झाल्याचे दृश्य दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात १७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटुळले.दर३० तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिक आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक ११७ प्रकरणे आहे. विभागात सहा महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक ११७ शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाला आहे. जानेवारी ९०, फेब्रुवारी मध्ये १००, एप्रिल ९६, मे ८४ व जून मध्ये ७० शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. जून अखेर १७०, यवतमाळ १५०, बुलढाणा १११, अकोला ९२ व वाशिम जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटडले.






