आशाताई बच्छाव
मोताळा तालुक्यात गारपीटीचा तडाखा
■ शेती पिकांचे प्रचंड नुकसान
मोताळा,(संजय पन्हाळकर):- जिल्ह्यातील गेल्या काही
दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील विविध भागात शेतकऱ्यांचे नुकसान केल्या नंतर आज शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी अवकाळी पाऊसा ने आपला मोर्चा मोताळा तालुक्या कडे वळविला आहे . या दरम्यान आज दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास मोताळा शहरासह संपुर्ण तालुक्यात वादळी वाऱ्या सह मोठ्या घरावरील तीन पत्रे उडून घरातील टीव्ही एलसीडी संपूर्ण पाण्यामध्ये भिजून पूर्णपणे खराब झाले प्रमाणात गारपीट व पाऊस झाला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीमुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी राज्याच्या तोंडी आलेला घासाचे अवकाळी पावसामुळे प्रचंड स्वरूपात नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मक्का, कांदा, ज्वारी, मिर्ची सह अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय भाजीपाला उत्पादन शेतकरी या अवकाळी पाऊसाने संपूर्ण रित्या झोडपला गेला आहे. एकीकडे लोकशाही चा सर्वात मोठा सण म्हणून लोकसभा निवडणुक प्रचार मोठ्या रंगात आली असतांना निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास या अवकाळीपावसाने हिसकावला आहे.