Home अमरावती नितेश राणेची रक्त तपासणी करावी”; बच्चू कडू चा भाजपा आमदारावर”प्रहार”.

नितेश राणेची रक्त तपासणी करावी”; बच्चू कडू चा भाजपा आमदारावर”प्रहार”.

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_205708.jpg

“नितेश राणेची रक्त तपासणी करावी”; बच्चू कडू चा भाजपा आमदारावर”प्रहार”.
______________
दैनिक युवा मराठा
पी.एन .देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
विदर्भातील अमरावती येथील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून आता महायुतीत वाद निर्माण झाल्याचे उघड झाले आहे. महायुतीतील प्रहार संघटनेचेआमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत भूमिका स्पष्ट केली. तसेच, या अमरावती मतदारसंघातून प्रहार च्या वतीने उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, बच्चू कडू चे वादळ ठोकण्यासाठी भाजपा काय करणार असा प्रश्न सर्वच मतदारांना पडला आहे. त्यातच, आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगल्याचा उल्लेख करत बच्चू कडूंना चिमटा काढला. त्यावर आमदार कडू यांची खचक प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वादळ शमविण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचाही वादळ शमले, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले होते. आमदार रितेश राणेच्या टीकेवर आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.”हळद नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाही. आम्ही सागरातील लाट आहोत.ते नितेश राणेला माहिती नसेल. त्यामुळे नितेश राणेने याबाबत वाचक करू नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. अमरावती पुरता लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला खेळावं तर आणखी काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणेवर जोरदार प्रहार केला आहे. अमरावती येथील पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडूंनी राणींना सुनावलं. वर्षा बंगल्यावर बोलला, सागर बंगल्यावर बोलला आहे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. धर्म आणि जाती पेक्षा इथे लोकांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे मजुरांचे प्रश्न आहेत, दिव्यांग बांधवाची, विधवा भगिनी चे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे. मूक बधिर विद्यार्थ्यांनी सातवी नंतर शिकू नये अस यांचा धोरण आहे. महत्त्वाची विषय घेऊन आपण लढलं पाहिजे, विषय हद्दपार होता, अशी ही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू वीस वर्षापासून अपक्ष लढतो. ना झंडा आहे ना नेता आहे. आमचा नेता मुंबई दिल्लीत बसलेला नसून आमचा नेता गावात आहे. मी एकनाथशिंदे साहेबांचा आदर करतो. त्यांनी दिव्यांग मंत्रालय आम्हाला दिलं. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं तर, युतीचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांनी आमच्या कारवाई करावी, असेही बच्चू कडू यांनी पोस्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here