आशाताई बच्छाव
केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
भाजपा बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी बूथ मेळावा कार्यक्रम साई लॉन्स, राममूर्ती येथे आज दि. २१ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला.
यावेळी ना. दानवे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना व विकासाची मोठी गती वाढली आहे, त्यामुळे देशाला पुन्हां पंतप्रधान पदी विराजमान करायचे असेल तर गाव पातळीवर बूथ संघटन मजबूत करा, आपले संघटन जर मजबूत असेल तर भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि बुथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जन कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करून संघटन मजबूत करावे असे ही बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ना.दानवे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी आ.नारायण कुचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, रिपाई पक्षाचे ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, अर्जुन गेही, सिद्धिविनायकजी मुळे, भागवत बापू बावणे, वसंतराव शिंदे यांच्यासह जालना तालुका जिल्हा पदाधिकरी, माजी जि.प.व पं.स सदस्य.,तालुका पदाधिकारी,शक्तीकेंद्र प्रमुख,सुपर वॉरीयर्स,बुथ प्रमुख व बुथ समिती,पेज प्रमुख समिती सर्व मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी यांनी मेळाव्यास विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.