आशाताई बच्छाव
बौद्ध समाजास उमेदवारी मिळाल्यास सर्व समाज
घटकांचा जाहिर पाठिंबा
= = = = = = = = = = =
श्रीरामपूर (वार्ताहर दिपक कदम)
येत्या लोकसभा व विधानसभा
निवडणूकीत बौद्ध समाजाच्या
उमेदवारास उमेदवारी मिळाल्यास सर्व समाज घटकांचा जाहिर पाठिंबा राहिल
असा निर्णय श्रीरामपूर येथील
अपूर्वा हॉल मध्ये पार पडलेल्या
बौद्ध , ख्रिश्चन , मुस्लिम आदिवासी मराठा , मातंग , अल्पसंख्याक व ओबीसी ‘ सामाजिक ऐक्य
परिषेदत सर्वानुमते घेण्यात
आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोकसेवा आघाडीचे
प्रविण फरगडे हे होते.
शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात
बौद्ध , ख्रिश्चन , मागासवर्गीय
समाजाची लोकसंख्या मोठ्या
प्रमाणात असल्यामुळे हे मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव झाले. परंतु
गेली तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये बहुसंख्येने
जास्त असलेल्या बौद्ध
समाजास उमदेवारी दिली
जात नाही हा बौद्ध समाजावर
फार मोठा राजकिय अन्याय
आहे . प्रस्थापित पक्ष व नेते
यांना मागासवर्गीय समाजाची
मते चालतात परंतु या समाजाचे उमेदवार चालत नाहीत .या पुरोगामी महाराष्ट्रात
जे लोक फक्त सत्तेसाठी नावापुरते
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे
नाव घेतात व त्यांच्या अनुयायांना संधी आल्यानंतर
मात्र उमदेवारी पासून वारंवार
डावलण्यात येत आहे.
सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी
ज्या दोन उमेदवारांची नावे
चर्चेत आहेत. त्यांनी शिर्डी
लोकसभा मतदार संघात
कोणेतही असे लोकोपयोगी
भरीव कार्य केलेले नाही .
निवडून आल्यानंतर यांनी
कधी जनतेकडे धुंकूनही
पाहिले नाही अशाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात
येत आहे. त्याचत्याच चेहऱ्यांना
पाहून जनता कंटाळलेली आहे . यांच्या नाकर्तेपणामुळे
त्यांच्याच पक्ष कार्यकर्त्यांनी
यांच्या उमदेवारीस विरोध
दर्शविला आहे.
तरी येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये
बौद्ध समाजास उमेदवारी
देण्यात यावी अन्यथा बौद्ध
ख्रिश्चन मागासवर्गीय अल्पसंख्याक समाज या
निवडणूकीत वेगळी भूमिका
घेईल असा इशारा देणात
आला आहे अशी माहिती
या सामाजिक ऐक्य परिषदेचे
आयोजक सुभाष दादा त्रिभुवन
व संदिप मगर यांनी दिली .
याप्रसंगी काँग्रेसचा उत्कर्षा
रुपवते , आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन ,
भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष
संदिप मगर , मुस्लिम कार्यकर्ते
अहमदभाई जहागिरदार , हनीफभाई पठाण ‘ भारत मुक्ती
मोर्चाचे रमेश मकासरे , राष्ट्रीय
मुस्लिम मोर्चाचे मुश्ताकभाई
तांबोळी , भारतीय लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल ,
ख्रिस्ती अल्पसंखाक परिषदेचे
जिल्हाध्यक्ष दीपक कदम
पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष
रावसाहेब त्रिभुवन आरपीआयच्या महिला आघाडी प्रमुख रमाताई धीवर
लोकसेवा आघाडीचे प्रवीण
फरगडे , मा. नगरसेवक दीपक
चरणदादा चव्हाण , सामाजिक
कार्यकर्ते पी.एस. निकम ,
डि एल भोंगळे आरपीआय
गवई गटाचे किशोर वाघमारे
दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष
संजय साळवे यांनी आपले
मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बेलापूरचे माजी
सरपंच महेंद्र साळवी , ग्रा पं
सदस्य राजेंद्र मगर , संजय बोरगे , शालिनी मगर तसेच
विश्वास भोसले , पास्टर सचिन
चक्रनारायण , अल्ताफ शेख
सुरेश अमोलिक दर्शन बारसे
अभिषेक बारसे विजय शेलार
व्ही एल गायकवाड अशोक
पवार विलास शेळके अनिल
माघाडे बबलू त्रिभुवन सुरेश ठुबे बाबासाहेब दिवेकर शाम आवारे संतोष भोसले
दीपक शिंदे शुभम लोळगे
अजित पठाण बाळासाहेब
मोकळ वसंत लोखंडे
अमोल उबाळे यासीन सय्यद
संतोष केदारी आनंद पठारे
कारभारी त्रिभुवन आदीसद
महिला युवक व विविध पक्ष
व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सुभाष त्रिभुवन यांनी केले
तर संदिप मगर यांनी आभार मानले.