Yuva maratha news
अखिल भारतीय ध्रुवताराअपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची भंडारा-गोंदिया लोकसभा रिंगणात जोरदार चर्चा सुरू
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:- भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून म्हणजे (१९५१-५२ ) या वर्षा पासून भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक चुरशीशी व राज्यातच नाही तर देशाची लक्षवेधी राहिली आहे. पण विकासापासून कोसो दूर जातो,जन प्रतिनिधी निवडून येतो नक्षली मागासवर्गीय निधीचा फायदा घेऊन बंगला ,गाडी ,व्यापार , आयसो आराम जनतेला भूल थापा देऊन, मोठ्या उद्योगाच्या नावावर नाचतो मयाराम. असे ह्या जिल्ह्याची दशा व दिशा चालली .अवजड उद्योमंत्री विकासाचे आस्वासनाचे शंख फुकतो. हल्लीचे जनप्रतिनिधी विकासाचे चुरस आंबे देतो.पण जनता जनार्दन संघटनाची दरी ओढून, विकसित आंब्याची गुठळी खातो.अशातच एक चर्चेचा विषय बनून चाललाय म्हणजे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव मुरारी भांबोरे हे साधी राहणी उच्च विचार विरोधकांच्या तोंडावर बोलून धुडकवून लावणे हा त्यांच्या स्वभाव कोणाच्याही पत्त्याखाली न झुकता स्वाभिमान बाळगून बहुजन,अपंग, गरीब,विधूर, होतकरूच्या कल्याणासाठी वरील संघटनाच्या माध्यमातून शासनाच्या नाडीला दाबून जिल्ह्यातील लोकांच्या विकासासाठी काम करत असून, जिल्ह्याच्या योग्यरित्या विकास व्हावा व बेरोजगारांचे अपंगांचे विदुरांचे निराधारांचे 85% बहुजनांचे प्रश्न उपस्थित करता यावे,जिल्ह्यातील बेरोजगाराचे प्रश्न सुटावे, तसेच जिल्ह्यातील बंद पडलेल् उद्योग व नवीन उद्योग सुरू व्हावे गोरगरीबांच्या, आर्थिक ,सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्त्याने आपल्या लेखणीतून समाजासाठी सात्यत्याने विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाची कानउघडणी करून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचा जलाशय प्रश्न असो की येथिल अनेक गावाच्या पुर्नवसनाच्या समस्या शासना पुढे मांडून त्यांच्या वर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. शेतकर्याला योग्य न्याय मिळावा म्हणून कर्ज माफी, बोनस , पिक विमा यासाठी सातत्याने पाठपुरावा लेखनी च्या माध्यमातून करत आहे आहेत. येवढेच नव्हे तर घरकुल योजनेच मानधन ते वाढविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषद शाळे मध्ये शिक्षकाची शिक्षक भरती झाली पाहिजे अशी मागणी शासन दरबारी वारंवार पत्रकारीतेच्या माध्यमातून धरून लावली येवढेच नव्हे तर निराधाराचा प्रश्न , कामगाराच समस्यांना आणि अपंग व्यक्तींना समाजात चांगले स्थान मिळावे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे माध्यमातून शासनापर्यंत पाठपुरावा केला जात आहे. म्हणून सतत ,राशन दुकानदारांचे प्रश्न ह्या हेतूने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक कार्यकते प्रेस संपादक मंडळाचे राज्य सरचिटणीस मा.संजीव मुरारी भांबोरे यांच्या नावाची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची पावती घेऊन जनतेतून निवडून देऊन भंडारा गोंदिया जिल्ह्याची जाणीव असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढनार असून उमेदवार तिकिट वाटपा बदल काही पक्षाची वांरवार फोन येत आहेत. असे संजीव भांबोरे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळेच जिल्हात सर्वत्र त्यांच्या नावाची निवडणुका जवळ आल्याने चर्चा जोरात सुरु आहे.