Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूर बाजार येथे गृह...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूर बाजार येथे गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे पाककला,पुष्परचना व रांगोळी स्पर्धा संपन्न.

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_052954.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूर बाजार येथे गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे पाककला,पुष्परचना व रांगोळी स्पर्धा संपन्न.
मयुर खापरे चांदुर बाजार
स्थानिक कै. ना.अ. देशमुख महाविद्यालय,चांदूरबाजार. येथे वार्षिक स्नेहसंमेलनात गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे पाककला, पुष्परचना व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेमध्ये पाककलेत 15 विद्यार्थी, पुष्परचनेत 8 विद्यार्थी व रांगोळी स्पर्धेत 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. प्रा. अभय दादा देशमुख, मा. स्वप्निल देशमुख व प्रा.डॉ. राजेश मिरगे सर व महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.प्रा. डॉ. वनिता चोरे मॅडम यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे परीक्षण प्रा. शुभांगी लांजेवार मॅडम, प्रा. वैष्णवी गोंगे मॅडम प्रा. स्वाती  काळे मॅडम, प्रा. डॉ. जयश्री पडोळे मॅडम व प्रा.डॉ. मिना  वैद्य मॅडम यांनी केले. रांगोळी स्पर्ध्यमध्ये प्रथम पारितोषिक कु.सानिका घाटोळ तर पाककलेमध्ये कु. धनश्री धोंडे व पुष्परचनेमध्ये कु. पायल नांदुरकर ह्या विद्यार्थीनींना गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी  गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निना चवरे व प्रा. डॉ. वैशाली देशमुख यांनी परिश्रम घेतले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous article२०१७-१८ पासूनच्या लाभार्थी वृध्द कलावंताना न्याय द्या – संजय कडोळे विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
Next articleअमरावतीत आजपासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांची मोफत वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here