आशाताई बच्छाव
शिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे यांचा सवाल
नेवासा -अहमदनगर, दिपक कदम
राजेंद्र वाघमारे
———————————————————-
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव झाल्यापासून आतापर्यंत थेट एका विशिष्ठ समाजालाच उमेदवारी मिळत असेल तर ? इतर समाजील जनता आणि त्यांचे नेते केवळ लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठीच आहेत काय? असा थेट सवाल उपस्थित करत शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक असलेले इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी उपस्थित करुन ज्या समाजाला आतापर्यंत उमेदवारी देण्यात आली तो समाज या मतदार संघात किती टक्के आहे? आणि इतर समाज किती टक्के आहे? याचा सारासार विचार करुन राजकिय पक्षांनी उमेदवारी देतांना मतदारांची संख्या लक्षात घेवूनच उमेदवारी द्यावी आणि केवळ एकच समाजाला उमेदवारी इतर समाजावर अन्याय करु नये अशी थेट मागणी करत या मतदार संघातील जातीय समिकरण आणि आकडेवारी मांडत शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक असलेले इंदिरा कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी बोलतांना केली.
शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव झाल्यापासून आतापर्यंत या मतदार संघात चर्मकार समाजालाच उमेदवारी दिली गेली जात आहे हा समाज या मतदार संघात किती टक्के आहे ? आणि बौद्ध समाज किती टक्के आहे ? याचा विचार न करता हा मतदार संघ राखीव झाल्यापासून एका विशिष्ठ समाजालाच उमेदवारी का दिली जाते ? मग इतर समाजावर हा अन्याय नाही का? आम्ही केवळ मतदानाचे राष्ट्रिय कर्तव्य बजावण्यासाठीच आहोत का? असा स्पष्ट आणि निर्भिड सवाल वाघमारे यांनी उपस्थित करुन आमच्या समाजाला यावेळेस उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणीही यावेळी त्यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी बोलतांना वाघमारे यांनी यावेळी केली असून यावेळेस आमच्या समाजाला उमेदवारी मिळाली नाहीतर आमचा समाज वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही ? असे परखड मतही वाघमारे यांनी व्यक्त करुन जातीय समिकरणाचे गणित मांडत खलबत्ते सुरु करुन या मतदार संघात बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.