आशाताई बच्छाव
राजकारणातील एक सुसंस्कृत नेता हरवला
जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशींना श्रध्दांजली
जालना, दि. २४(प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे
माजी सभापती मनोहर जोशी यांचे दुःखद निधन झाले त्यानिमित्त जालना जिल्हा
शिवसेनेच्या वतीने शहरातील शिवसेना भवन येथे आज शुक्रवार २३ फेब्रुवारी
रोजी श्रद्धांजली सभेचे शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख
शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
अनिरुद्धची खोतकर,रमेश गव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर यांनी अयोजन केले.
यावेळी बोलताना उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, हर जोशी हे
मुख्यमंत्री असताना अनेक वेळा शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर
त्यांच्याशी भेटलो त्यांना असणारी शेतकर्या विषयीची कणव त्यांच्या
निर्णयातून बोलण्यातून सातत्याने दिसून यायची. अत्यंत सुस्वभावी व विनम्र
असणारा हा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे आपले भाग्यच.
यावेळी बोलताना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे म्हणाले की, माझ्या राजकीय
जीवनाच्या प्रवासात मनोहर जोशी हे यांचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मी आमदार झाल्यानंतर त्यांच्याबरोबर आमदार म्हणून पाच वर्ष केलेले काम हे
चिरस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. त्याच्या सहवासातील अनेक आठवणींना
त्यांनी यावेळी उजाळा दिला.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, मनोहर
जोशी हे कार्यकर्ते व पदाधिकार्यांना जीव लावणारे व मदत करणारे नेते.
अनेक वर्षापासून पक्षात शिवसैनिक म्हणून काम करताना अनेक वेळा त्यांचा
सहवास लाभला. त्याच्या या निधनानिमित्त अनेक आठवणी आज मनात दाटून येत
असल्याचे सांगत त्यांनी जालना शहरात मुख्यमंत्री पद�