आशाताई बच्छाव
अंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ
केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती
———–
अंबड / जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध घटकांसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने व समृद्धी शुगर्सच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कलमध्ये शनिवारी या अभियानास सुरुवात झाली.
भाजापा नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती गाव चलो अभियानातून घराघरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील नवीन पिठोरी सिररसगाव येथे विश्वंभर गाडेकर, जगन्नाथ काकडे, गोरख गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भाऊसाहेब खेडकर ,अनिरुद्ध कोळेकर, दीपक कोळेकर ,भागवत गाडेकर यांनी घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेले पत्रक वाटप केले. तसेच नागरिकांमध्ये या योजना विषयी माहिती दिली. तर समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारसवाडा गावात हे अभियान राबविण्यात आले. वैशाली घाटगे यांनी महिलांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजना व घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. या अभियानामुळे मोदी सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचत आहे. गावकऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले.