Home नाशिक रावळगाव चॉकलेट आता पुन्हा गजबजणार “पान पसंद” ची चव पुन्हा चाखायला मिळणार…!

रावळगाव चॉकलेट आता पुन्हा गजबजणार “पान पसंद” ची चव पुन्हा चाखायला मिळणार…!

157
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_155417.jpg

रावळगाव चॉकलेट आता पुन्हा गजबजणार “पान पसंद” ची चव पुन्हा चाखायला मिळणार…!
(राजेंद्र पाटील राऊत)
रावळगाव दि.१०, स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेला नाशिकच्या रावळगावातील चॉकलेट कारखाना पुन्हा गत वैभवाच्या पाऊलखुणा जोपासत सुरू होणार असल्याने आता परत एकदा “पान पसंद”चॉकलेट सह विविध प्रकारच्या रावळगाव गोळ्यांचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या रावळगाव येथे वालचंद हिराचंद यांनी रावळगाव साखर कारखान्या सोबतच रावळगाव चॉकलेटची निर्मिती केली होती,या गोळ्यांमध्ये पान पसंद, मँगो,आदिसह विविध प्रकारच्या गोळ्यांनी एकेकाळी संपूर्ण देशासह परदेशातही आपला नावलौकिक वाढविला होता तर या रावळगाव गोळयांची दुरदर्शनवर देखील खास जाहिरात चालविली जात होती.मात्र नंतरच्या काळात रावळगाव येथील साखर कारखाना सोबतच गोळी कारखान्याला पण उतरती कळा लागल्याने रावळगाव चॉकलेट पण आठवणीलाच राहिल की काय? असे जाणवत असतानाच,आता पुन्हा रावळगाव गोळयांना गतवैभव प्राप्त होऊन रावळगावचे नाव पुन्हा सर्वत्र गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांनी आता रावळगाव चॉकलेट कारखान्यांची मालकी २७ कोटी रुपयांना विकत घेतल्याने भविष्यात लवकरच गोळ्यांची चव चाखता येणार असली तरी या उद्योगामुळे रावळगावला परत गतवैभव प्राप्त होईल अशीच चिन्हे सध्या दिसून येत आहेत.

Previous article🙏💚 मनन चिंतन 🌹 विषय:- शुभ भावना व विश्व कल्याण.
Next articleखोदकाम करताना आढळली कौंडण्यपूर मध्ये प्राचीन मूर्ती: कौंडण्यपूर येथे अनेक पुरातन वास्तू व साहित्य संपदा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here