Home उतर महाराष्ट्र देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा आहे- आमदार बाळासाहेब थोरात

देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा आहे- आमदार बाळासाहेब थोरात

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_124710.jpg

‘देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा आहे- आमदार बाळासाहेब थोरात
श्रीरामपूर( प्रतिनिधी दिपक कदम) सुखदेव सुकळे यांनी लिहिलेल्या’ देशहिवादी’ ग्रंथातून स्व.डॉ.अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातआणि शिक्षणतपस्वी विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या समर्पित कार्य, विचारांचा अत्यंत साक्षेपी वेध घेणाऱ्या’ देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा असल्याचे मत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
येथील महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री- प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सहावा वर्धापन दिन आणि सुखदेव सुकळे लिखित’ देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष अड,भगीरथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई सुधीर तांबे,मुंबर्ड येथील उद्योजक अनिल अण्णासाहेब शिंदे, छ्त्रपती संभाजीनगरचे उद्योजक रणजित पंडितराव थोरात. अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे मुख्या ट्रस्टी डॉ राजीव रावसाहेब शिंदे, नाशिक येथील उद्योजक अभिनव गोडसे आदी उपस्थित होते. दीप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी मान्यवर पाहुण्याचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्पे, पुस्तके,शाली देऊन सन्मान केले.सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये व कोपरगावचे प्रो. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. लेखक सुखदेव सुकळे यांनी पुस्तकाविषयी विवेचन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषीसेनानी डॉ.अण्णासाहेब शिंदे,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि शिक्षणतपस्वी अड, रावसाहेब शिंदे या तिघांच्या जीवनाचा शोध आणि बोध देणारा’ ‘देशहितवादी’ हे समर्पक शीर्षक देऊन अनुभवमय आणि उत्कट भाव शीलतेने ग्रंथ सुखदेव सुकळे यांनी निरपेक्ष जाणिवेतून लिहिला हे विशेष कौतुकास्पद आहे, असे सांगून आमदार थोरात यांनी स्वातंत्र्य् पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील योगदान, शिक्षण,शेती सहकार, कामगार, दुग्धोत्पादन, पाणी पाटबंधारे, पर्यावरण,धरणे, न्याय, कामगार इ. क्षेत्रातील तिघांच्या जीवनाचा साम्यरूपी चरित्रपट विशद केला. डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. सौ. दुर्गाताई तांबे यांनी अत्यंत भावस्पर्शी जाणिवेने आठवणी सांगितल्या.अनिलं शिंदे,अभिनव गोडसे यांनी अनेक दुर्लक्षित आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणातून अड, भगीरथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी डॉ. अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात आणि अड, रावसाहेब शिंदे यांच्या मुळा, काकडी इत्यादी धरणाच्या योगदानाचा आढावा घेतला पाणी आणि शेतीसाठी अण्णासाहेब शिंदे यांचे कार्यअपूर्वआहे. भाऊसाहेब थोरात यांचे योगदान मौलिक आहे. अण्णासाहेब, भाऊसाहेब, रावसाहेब ही त्रिमूर्ती आजच्या युवकांनी समजून घ्यावीअसे आवाहन करून ते म्हणाले, अण्णासाहेब व रावसाहेब हे राम-लक्ष्मण तर होतेच पण त्यापेक्षा रावसाहेब हे मला भरतरुपी समर्पित जाणिवेचे वाटतात हे विशद केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. शशिकलाताई शिंदे, सौ. अरुणाताई शिंदे, सौ.जयश्री शेंडगे, दिलीप शिंदे, बाळासाहेब देशमुख, अशोकनाना कानडे, सचिन गुजर, आशिष बोरावके ज्ञानेश्वर मुरकुटे, पत्रकार प्रकाश कुलथे,अड, भागचंद चुडिवाल, माजी सचिव व प्राचार्य शिवाजीराव भोर,डॉ प्रकाश मेहकरकर, प्रा. शिवाजीराव बारगळ,काशिनाथ गोराणे,चंद्रपूरचे नामदेवराव ठाकरे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ.मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्राचार्य विनोद रोहमारे, प्राचार्या सौ.रंजना जरे प्रा.डॉ. भास्कर निफाडे, मुख्याधापक भागचंदऔताडे,ग्रंथपाल डॉ.अर्जुन आनंदकर,सुभाष लिंगायत, प्रा. डॉ. शरद दुधाट, चंद्रकांत कोकाटे, सतिश थोरात, रावसाहेब राशिनकर, चित्रा सूरडकर,भीमराज बागूल, विद्यानिकेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर, सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, साहेबराव सुकळे आदिंनी नियोजन केले. तर सुदामराव औताडे यांनी आभार मानले.

Previous articleलोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडाऱ्यात विषबाधा ; तर रूग्णांवर तातडीने उपचार चालु
Next articleगोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार गांगर्डे,राठोड,खेडकर,शेख,पुरी यांना जाहिर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here