आशाताई बच्छाव
जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २० दिवसापासून
पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांचा संतप्त सवाल
जालना,दि. २७(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २०
दिवसापासून पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय, असा संतप्त सवाल
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी महापालिकेला केला.
शहरातील गांधीनगर व ढोरपुरा भागातील काही नागरिकांनी जिल्हाप्रमुख तथा
माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांना फोन करून पाण्यामुळे होणारे हाल
कानावर टाकले. शहरातील अनेक विभागांमध्ये मागील १५ ते २० दिवसापासून
महानगर पालिकेने पाणीपुरवठा केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे
पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. अद्याप उन्हाळाही लागलेला
नाही.जायकवाडी योजनेतूनही मोठा पाणीपुरवठा होतो पण केवळ महानगर
पालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना तीव्र
पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आज यावर कोणी बोलायला तयार नाही.
एकीकडे ८०० रुपये असणारी पाणीपट्टी पालिकेने २८०० रुपये केली पण दुसरीकडे
नागरीकांना पाणीपुरवठा मात्र अनियमितच व दुषित केला जात आहे. त्यामुळे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज शहरातील गांधीनगर व ढोरपुरा
भागातील काही नागरिकांनी जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव
अंबेकर यांना फोन करून पाण्यामुळे होणारे हाल कानावर टाकले. माहिती
मिळताच जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी तात्काळ त्या भागात धाव घेऊन
सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच पालिकेचे अभियंता व
लाईनमेन यांना बोलवून हा प्रश्न का निर्माण झाला? पाणी कधी सोडणार? अशी
विचारणा केली. १५ ते २० दिवस पाणी सोडले नाही, मग तुम्ही झोपा काढता काय?
असा संतप्त सवाल ही जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांनी यावेळी केला .